ठळक बातम्या

डहाणूकर प्रदूषण प्रश्नी डॉ.मकासरेंनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाहीतर मंत्रालयात आंदोलन करणार - डॉ.विजय मकासरे

जावेद शेख : श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर येथील अमित डहाणूकर इंडस्ट्री मुळे होत असलेल्या जमीन आणि वायू प्रदूषण प्रश्नी डॉ. विजय मकासरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत निवेदन दिले आहे. यावेळी हा विषय पर्यावरणाशी निगडित असून हे खाते मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडे असल्याने त्यांच्याशी चर्चा करून डहाणूकर इंडस्ट्रीज वर त्वरित कारवाई करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. विजय मकासरे यांना दिले.

श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर येथे अमित डहाणूकर यांच्या टिळक नगर इंडस्ट्रीज मध्ये सुरू असलेल्या प्रदूषणामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी या नापीक झाल्या असून तेथील वायू प्रदूषणामुळे अनेक आबालवृद्धांना श्वसनाचा त्रास सुरू झालेला आहे. यामुळे कित्येकांचा बळीही गेलेला आहे. महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्ड यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे. तेथील जमिनीत बोर किंवा विहीर घेतल्यानंतर लाल रंगाचे दूषित पाणी येते तसेच जमिनीत पिके ही येत नाहीत. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे, अशा आशयाचे निवेदन डॉ.विजय मकासरे यांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समक्ष भेटून दिले आहे.

या निवेदनाचा पाठपुरावा करून तसेच पर्यावरण खाते हे मुख्यमंत्री यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून संबंधित डहाणूकर इंडस्ट्रीजवर त्वरित कारवाई करू तसेच महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्ड यांनी जाणीवपूर्वक या कंपनी कडे दुर्लक्ष केले आहे का ? याची माहिती घेऊन संबंधित कंपनीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करू तसेच नव्याने प्रदूषणा बाबतीत तपासणी करण्यास सांगू असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. मकासरे यांना दिले आहे.

या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, ज्या स्थानिकांच्या जमिनींना पीक झाले आहे व ज्यांना या प्रदूषणाचा त्रास होत आहे त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाला कायमस्वरूपी नोकरी द्यावी तसेच त्यांना नापीक झालेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा अन्यथा 15 ऑगस्ट 2024 रोजी मंत्रालय येथे आंदोलन करण्यात येईल असे म्हटले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button