अहिल्यानगर

बारागांव नांदुर येथे अश्विनी पोर्णिमा साजरी

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : राहुरी तालुक्यातील बारागांव नांदुर येथे रिपब्लिकन सेनेचे शाखा प्रमुख अंजुमभाई पटेल व पदाधिकारी यांच्या वतीने अश्विनी पौर्णिमे निमित्ताने जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न, प्रख्यात पंडित भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला रिपब्लिकन सेनेचे युवक तालुका प्रमुख विनोद पवार यांच्या हस्ते पुष्पहार घालून तालुका प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करून बौद्धाचार्य चंद्रकांत जाधव यांनी सामुदायिक त्रिशरण पंचशील भिम स्तुती भिम स्मरण व बुद्ध पुजा घेतली.

तसेच महान संत मोहम्मद पैगंबर यांचे विचार मुस्लिमच नव्हे तर संपूर्ण जगाचे कल्याण करणारे विचार आहे. पैगबरांनी स्त्रियांना मानाचे स्थान निर्माण करून दिले. स्वतः विधवा महीलेसी विवाह करून असलेली द्वेष भावना कमी करण्याचा प्रयत्न केलाा. या विषयावर चंद्रकांत जाधव व सद्दाम पिरजादे यांनी भाषणे केली. यावेळी पोपट पवार, अस्लम पटेल, अतुल पवार, आकाश क्षीरसागर, निलेश पवार, अजय जाधव, योगेश जगधने, भरत गायकवाड, बशिरभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button