अहमदनगर

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूबियांच्या वारसांना आ. तनपुरेंच्या हस्ते धनादेशाचे वितरण

राहुरी | बाळकृष्ण भोसले – नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जफेडी बाबतचा तगादा या कारणामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबांना हातभार लागावा म्हणून त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचे धोरण शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार राहुरी तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण आज सोमवारी तहसील कार्यालयात करण्यात आले.
यावेळी तहसीलदार फसिओद्दीन शेख, डॉ बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक भारत तारडे, जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज गाडे, रघुनाथ झिने, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, अविनाश ओहोळ, शब्बीर देशमुख आदी उपस्थित होते. प्रकाश भाऊसाहेब गडाख, रमेश गणपत म्हसे, रवींद्र बाळासाहेब घुगरकर, शिवराज शहाजी घुगरकर या मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा मदतीचा धनादेश यावेळी देण्यात आला.

Related Articles

Back to top button