अहिल्यानगर

जिल्हा विद्युत समिती अध्यक्षपदी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची नियुक्ती

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : केंद्र शासनाने ग्रामीण व शहरी भागात विजेच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, वीज गळती कमी करण्यासाठी योजना निर्माण करण्याचे योजिले आहे. सदर योजनेच्या कामकाजावर लोकप्रतिनिधीचे नियंत्रण व सहभाग ठेवण्याकरिता जिल्हा विद्युत समिती गठीत करणेबाबत सहसचिव उर्जा मंत्रालय भारत सरकार यांनी सूचित केले आहे. त्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नियुक्त केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांची व सहअध्यक्षपदी खा.निलेश लंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या समितीच्या सदस्यपदी ना.प्रा राम शिंदे, ना. राधाकृष्ण विखे पाटील, आ.किशोर दराडे, आ.सत्यजित तांबे, आ.शिवाजीराव गर्जे, आ.शिवाजी कर्डिले, आ.श्रीमती मोनिका राजळे, आ.संग्राम जगताप, आ.किरण लहामटे, आ.आशुतोष काळे, आ.रोहित पवार, आ.अमोल खताळ, आ.हेमंत ओगले, आ.विठ्ठल लंघे, आ.काशिनाथ दाते, आ.विक्रम पाचपुते व सदस्य सचिवपदी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, तर संयोजकपदी अधीक्षक अभियंता महावितरण अहिल्यानगर रमेशकुमार पवार याची नियुक्ती करण्यात आली आहे.

या समितीने केंद्र पुरस्कृत योजनेचा आढावा घेणे व अंमलबजावणी दरम्यान सहनियंत्रण ठेवणे, तीन महिन्यातून एकदा बैठक घेणे, वितरण प्रणाली निर्माण करणे, व त्याचे सुव्यवस्थापन करणे, योजनेच्या प्रभावामुळे विजेची गुणवत्ता व विश्वसनीयतेमध्ये सुधारणा करणे, ग्राहक समाधान व तक्रार निवारण करणे, आदी कामे करावयाची आहेत.

या निवडीबद्दल खा.भाऊसाहेब वाकचौरे, खा निलेश लंके व सर्व सदस्य तसेच जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत, प.भारत संघटक सुभाष पोखरकर, संपत समिंदर, बी आर चेडे व सहकारी, आदींनी अभिनंदन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button