भाव वाढल्याने ताटातून कोथिंबीरसह पालेभाज्या गायब…
पैठण तालुक्यात स्थानिक व बाहेरील भाज्यांची आवक अतिशय कमी असल्याने पुढचे काही दिवस भाव तेजीत रहाण्याची शक्यता आहे. हॉटेल व रेस्टारंट सुरू झाले असून छोटे मोठे समारंभ सुरू झाले आहेत. भाज्याच्या मागणीत दुपटीने वाढ झालेली आहे. त्यातुलनेत आवक कमी असल्याने भावात वाढ झालेली आहे. नवीन पालेभाज्या येण्यास महिनाभराचा अवधी आहे. त्यामुळे पुढील काही दिवस चढ्याच दराने भाजी खरेदी करावी लागणार आहे. वांग्याच्या भावातील वाढ कायम आहे. कोथिंबीर, मेथी, भेंडीचे भाव वाढले आहेत. किरकोऱ बाजारात सर्वच भाज्या प्रतिकिलो ६० ते १०० रूपये झालेले आहेत.
किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर प्रतिकिलो
वांगे-१००, गवार- १००, मेथी -४० जुडी, कोथिंबीर ४० जुडी, भेंडी-५०, शिमला मिरची- ६०, कारले -५०, पालक जुडी-३०, गवार- ६० तर टोमॅटो ६० रूपये किलो आहे.
पाल्या भाज्याने एवढे भाव वाढले, त्यातच दिवाळी सण आला अन् कोथिंबीर ४० रूपयेला झाली. त्यामुळं आता विना कोथिंबीरची भाजी करावी लागत असल्यामुळे भाजी पाला हा ताटातून गायब होऊ लागले आहे.
–योगिता जाधव, पाचोड(महिला)