छत्रपती संभाजीनगर

भाव वाढल्याने ताटातून कोथिंबीरसह पालेभाज्या गायब…

विजय चिडे/पाचोड : अतिवृष्टीमुळे शेतातील भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने पाचोड (ता.पैठण) येथील आठवडी बाजारातील भाजीची आवक निम्याने कमी झालेली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव दुप्पटीने वाढल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून पालेभाज्या गायब झाल्या आहे. कोथिंबीर, पालक, भेंडीचे दर आकाशाला भिडले आहेत. प्रतिकिलो दर साठ ते शंभर रूपये असे वाढले आहेत.

पैठण तालुक्यात स्थानिक व बाहेरील भाज्यांची आवक अतिशय कमी असल्याने पुढचे काही दिवस भाव तेजीत रहाण्याची शक्यता आहे. हॉटेल व रेस्टारंट सुरू झाले असून छोटे मोठे समारंभ सुरू झाले आहेत. भाज्याच्या मागणीत दुपटीने वाढ झालेली आहे. त्यातुलनेत आवक कमी असल्याने भावात वाढ झालेली आहे. नवीन पालेभाज्या येण्यास महिनाभराचा अवधी आहे. त्यामुळे पुढील काही दिवस चढ्याच दराने भाजी खरेदी करावी लागणार आहे. वांग्याच्या भावातील वाढ कायम आहे. कोथिंबीर, मेथी, भेंडीचे भाव वाढले आहेत. किरकोऱ बाजारात सर्वच भाज्या प्रतिकिलो ६० ते १०० रूपये झालेले आहेत.

किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर प्रतिकिलो 

वांगे-१००, गवार- १००, मेथी -४० जुडी, कोथिंबीर ४० जुडी, भेंडी-५०, शिमला मिरची- ६०, कारले -५०, पालक जुडी-३०, गवार- ६० तर टोमॅटो ६० रूपये किलो आहे.

पाल्या भाज्याने एवढे भाव वाढले, त्यातच दिवाळी सण आला अन् कोथिंबीर ४० रूपयेला झाली. त्यामुळं आता विना कोथिंबीरची भाजी करावी लागत असल्यामुळे भाजी पाला हा ताटातून गायब होऊ लागले आहे.

    –योगिता जाधव, पाचोड(महिला)

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button