शिक्षणवारी ज्ञान पंढरी

बालभारती विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करते -कृष्णकुमार पाटील

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांसोबत पत्रकारांचाही सत्कार

राहुरी : बालभारती पाठ्यपुस्तक निर्मितीतून मराठी भाषेतील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत असते. बालभारतीची मराठी पुस्तके सर्व माध्यमातील शाळांना उपयोगी आहेत. त्यामुळे बालभारती आज घरोघरी पोहोचली असल्याचे बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले विद्यालयातील विविध परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. महानंद माने होते. यावेळी प्राचार्य अरुण तुपविहिरे, जितेंद्र मेटकर, बाबासाहेब पवार, बाळासाहेब खेत्री उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले, शाळेचे विद्यार्थी भाग्यवान आहे. ज्यांनी शिक्षणाचा पाया घालून दिला, त्या सावित्रीबाई फुले विद्यालयात ते शिक्षण घेत आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांवर चांगल्या प्रकारचे संस्कार होत आहेत. यावेळी संस्थेचे सचिव महानंद माने, जितेंद्र मेटकर व पत्रकारांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी पत्रकार जावेद शेख, अशोक मंडलिक, आकाश येवले, रियाज देशमुख, प्रसाद मैड, रमेश जाधव, सचिन पवार, कृष्णा गायकवाड, देवराज मन्तोडे, उदय धामने आदी उपस्थित होते व आभार प्राचार्य अरुण तुपविहिरे यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button