कृषी
वरवंडी गावात कृषी कन्या मार्फत ‘ ई पीक पाहणी ‘ नोंदणी व जनजागृती
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : कृषी महाविद्यालय धुळे च्या कृषी कन्या गीतांजली दिगंबर अडसुरे आणि कोमल अशोक साळवे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव जागरूकता आणि औद्योगिक सलग्नता अंतर्गत ‘ वरवंडी ‘ गावामध्ये पिक पाहणी मोबाईल ॲपद्वारे गाव नमुना नं. १२ मध्ये पीक नोंद करण्यासाठी शेतकर्यांना आवाहन व मदत केली आहे.
ई-पीक पाहणीद्वारे आपल्या शेतातील पिकाची नोंद आपणास स्वत: शेतात जाऊन करायची आहे. नोंद न केल्यास आपला ७/१२ मधील पीक फेरा कोरा राहील. यामुळे कोणतेही शासकीय मदत/ पीक विमा/ पीक कर्ज/ अनुदान प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी.
ई-पीक पाहणी ॲपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे, ना सरकारची फसवणूक. ॲपवरील नोंदींमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे; याची अचूक आकडेवारी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. पिकांची अचूक आकडेवाडीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. बी – बियाणे लागणारे खत उपलब्ध करून देता येणार आहे. देशात किती क्षेत्रावर किती उत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील याचा उपयोग होणार आहे. एका मोबाईलमधून २० शेतकऱ्याच्या नोंदी करता येणार आहे, असे ई-पीक पाहणी चे फायदे यावेळी शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे.