कृषी
कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ व संशोधन सहयोगी यांचा अभ्यास दौरा
राहुरी विद्यापीठ / जावेद शेख : हवामान बदलाचा परिणाम शेतीक्षेत्रावर मोठया प्रमाणावर होत आहे. हवामान बदलाचा अभ्यास करुन पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहचविता शेतीतील उत्पादन घेता येईल. याकरीता नवीन तंत्र विकसीत करुन शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्यित राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत शास्त्रज्ञ व संशोधन सहयोगींसाठी एक दिवसीय अभ्यास दौर्याचे आयोजन सहयाद्री फार्म, नाशिक या ठिकाणी करण्यात आले होते.
या अभ्यास दौर्यात सकाळच्या सत्रात प्रितेश कारे, जनसंपर्क अधिकारी, सहयाद्री फार्म यांनी सहयाद्री फार्मवर एकुण १०० एकरवर चालू असलेल्या विविध प्रकल्पांविषयी सादरीकरण केले. तसेच फळांची प्रतवारी, वर्गीकरण आणि ग्रेडिंग, तसेच फळ आणि भाजीपाल्यांच्या आयक्युएफ पध्दतींविषयी माहिती देवून प्रकल्पास भेट दिली. दुपारच्या सत्रात सहयाद्री फार्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंजि. विलास शिंदे यांच्या उपस्थितीत विविध डिजिटल, आयओटी, माती परिक्षण, जैवतंत्रज्ञान, रेसीडुअल लॅब, जैवखत, फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रकल्पास तसेच १८ एकरवर असलेल्या पॉलीहाऊसला भेट देवून विविध प्रयोगशाळेतील आधुनिक संशोधने व उपकरणे, इत्यादिं विषयी माहिती दिली. या अभ्यास दौर्यात आत्मसात केलेल्या नवनविन तंत्रज्ञानाच्या माहितीचा उपयोग विविध संशोधनात्मक कार्यास मदत होईल. या अभ्यास दौर्यात विविध विभागातील ११ संशोधन सहयोगी सहभागी झाले होते. या दौर्याचे आयोजन प्रकल्पाचे सहप्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे आणि कास्ट प्रकल्पाचे खरेदी अधिकारी डॉ. अतुल अत्रे यांनी केले.