अहिल्यानगर

गावाच्या विकासात कामगार तलाठी यांचे योगदान महत्त्वाचे-अशोकराव तुपे

वांबोरी प्रतिनिधी : आपल्या देशावर राजे महाराज्यांसह इंग्रजांनी शेकडो वर्ष राज्य केले. त्यावेळी राज्याचे आर्थकारण हे शेतसारा गोळा करून चालत होते. सध्याच्या काळात हेच काम गावचे कामगार तलाठी करतात. त्यामुळे गावासह राज्य व देशाच्या विकासात गावचे कामगार तलाठी महत्वाची भुमिका बजावतात, असे प्रतिपादन श्री संत सावता माळी युवक संघाचे जिल्हा अध्यक्ष अशोक तुपे यांनी केले.


वांबोरीचे नवनियुक्त तलाठी अभिजीत क्षिरसागर यांची वांबोरी येथे कामगार तलाठी पदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री संत सावता माळी युवक संघ व पोलिस मित्र संघटने मार्फत शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, पोलिस मित्र संघटनेचे शहराध्यक्ष दिपकराव साखरे, उपाध्यक्ष सुनील शिंदे, भारत गाडेकर, राजेंद्र मोरे, सचिन मकासरे, अमोल जोशी, काशिनाथ रहाणे, सागर साळुंके, गणेश गवते आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button