अहिल्यानगर
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच मोठे नुकसान
राहुरी शहर प्रतिनिधी : येथील हनीफ शेख या शेतकऱ्यांच्या शेळ्यांवरती (शुक्रवारी 13) रात्री बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये चार शेळ्या दगावल्या असून सुमारे 35 ते 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांमधून पिंजरा लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राहुरी शहरामधून मुळानदी गेल्याने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. याच उसाचा फायदा घेत बिबट्या दिवसा उसाच्या आडोशाला लपून बसतात आणि रात्रीच्या वेळी पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात. या आधीही बिबट्याने अनेक वेळा मेंढ्या, शेळ्या, वासरे ,पाळीव कुत्रे यांना आपले भक्षक बनवले आहे. अनेक वेळा शेतामध्ये काम करणाऱ्या शेतमजुरांना देखील बिबट्याने दर्शन दिले आहे. त्यामुळे अनेक वेळा शेतामध्ये काम करण्यास मजूर तयार होत नाही. येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा वन विभागाकडे पिंजरा लावण्यासंदर्भात मागणी केली होती. तरी देखील वन विभागाने अद्याप पर्यंत पिंजरा लावलेला नाही. लवकरात लवकर पिंजरा लावून पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले थांबवावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
यावेळी तलाठी कार्यालयाचे भाऊसाहेब शिरसाट, राधेश्याम यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. फॉरेस्ट खात्याचे वनरक्षक अधिकारी पवन निकम, पोपट शिंदे ,गोरख मोरे ,सहकारी शिवाजी गाडे आदींनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. या परिसरात पिंजरा लावून बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी आयुब शेख ,जमीर आतार जुबेर आतार, अक्षय उंंडे , रामेश्वर उंंडे , पाटीलबा उंंडे ,राजू तोडमल ,सुनील शेळके, नितीन वराळे, जालिंदर सांगळे आदींनी केली आहे.