अहिल्यानगर
रस्ता दुरुस्ती आंदोलन स्थगित-शिवाजीराजे पालवे
अहमदनगर प्रतिनिधी : कोल्हार उदरमल घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या घाटातील रस्ता दुरूस्ती करण्यासाठी आंदोलनाचा इशारा जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनने दिला होता. लवकरच या रस्त्याचे काम चालू होणार असल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराजे पालवे यांनी सांगितले आहे.
जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनने कोल्हार उदरमल घाटातील रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर यांना 08 सप्टेंबर 2021 व 16 आक्टोबर 2021 रोजी दिले होते. कोल्हार उदरमल घाटाची दुरूस्तीच्या कामाची सुरूवात न झाल्याने जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अहमदनगर व कोल्हार, उदरमल, चिचोंडी, शिराळ डमाळवाडी, गितेवाडी, धारवाडी, राघुहिवरे, कडगाव या पाथर्डी तालुक्यातील गावांंतील नागरिकांनी 22 आक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वा. कार्यकारी अभियंता सार्वजनीक बांधकाम विभाग अहमदनगरच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
आता या आंदोलनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. आंदोलनाची दखल घेऊन कारवाई होत असल्याने नागरिकांनी व जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनने सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले आहे.