सामाजिक

शिवाजीराजे पालवे यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

अहमदनगर प्रतिनिधी : जय भगवान युवा प्रतिष्ठाण पाथर्डीचे अध्यक्ष आजिनाथ दहिफळे यांनी नुकताच 2021 चा समाज रत्न पुरस्कार जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनचे शिवाजी रखमाजी पालवे यांना जाहीर केला आहे.
शिवाजी पालवे हे पाथर्डी तालुक्यातील कोल्हार गावचे सुपुत्र आहेत. भारतीय स्थल सेना मध्ये 17 वर्ष देशसेवा करून सेवानिवृत झाले. शिवाजीराजे पालवे यांनी सेवा निवृती नंतर अहमदनगर जिल्हातील माजी सैनिकांना एकत्रित करून समाजसेवेचे व्रत हाती घेतले असुन शहीद परिवार, आजिमाजी सैनिक, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवत आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, पाणी आडवा पाणी जिरवा, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, वृद्धांना मदत, पशु पक्षी प्राणी साठी पाण्याचे नियोजन, पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण चळवळ उभारून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन करत आहेत.

कोल्हारचे कोल्हुबाई गड येथील महादेव मंदीर परिसरात 500 वड झाडांची रोपण महादेव शंकराच्या पिंडीच्या आकारात केले आहे. तर 625 वड, पिंपळ, उंबर, लिंब, बेल वृक्षाचे जागती पंच वृक्ष नगर तालुक्यातील बहिरवाडी येथे भैरवनाथ मंदीर परीसरात रोपण केले आहे. मोहटादेवी 111 वड, तारकेश्वर 150 वड, 500 महोगणी, पावण गणपती देडगाव 111 वड, हरेश्वर देवस्थान करंजी जेऊर नगर असे हजारो वृक्ष लागवड केली आहे.

जिल्हात वृक्षमित्र म्हणूण त्यांचे आदराने नाव घेतले जाते. पुरस्कार जाहीर झाल्यावर सामाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे, पद्मश्री पोपट पवार, सरपंच भास्करराव पेरे पाटील, सामाजिक, राजकीय तसेच मित्र परिवाराकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. पुरस्कार प्रेरणा देतात प्रेरणेने राष्ट्र मोठे होते असे प्रतिपादन अध्यक्ष आजिनाथ दहिफळे यांनी केले.

Related Articles

Back to top button