अहिल्यानगर
राहुरी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय
राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी तालुक्यातील मुळा धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत समाविष्ट न केल्यास येणाऱ्या सर्वच निवडनुकीत तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. तसा सर्वानुमते ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत मुळा धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. तसेच या कृती समितीच्या वतीने २२ नोव्हेंबर रोजी नाशिक येथील जलसिंचन प्राधिकरण कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यातील मांजरी, पिंपरी अवघड, जांभळी,वावरथ,वडनेर,दरडगाव थडी, वरवंडी, घोरपडवाडी, राहुरी खुर्द, कुरणवाडी, बारागाव नांदूर, तमनर आखाडा आदि गावांमधील शेतक-यांची जमीन मुळा धरण लाभक्षेञात संपादित झाली आहे. धरण ग्रस्तांना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याची तरतूद असताना देखील ६० वर्षांपासून शासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यापासून मूळ धरणग्रस्तांना वंचित ठेवण्यात आले आहे.तरी प्रकल्पग्रस्तांच्या नेमणुकीचे कश्यपी व बारवी तत्कालीन धोरणे विचारात घेऊन धरणग्रस्तांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे या धर्तीवर जलसंपदा विभागाने संबंधितांशी समन्वय साधून संदर्भ क्रमांक १ शासन निर्णय मधील तरतुदीनुसार शासकीय नोकरी उपलब्ध करून वर्ग-३ व वर्ग-४ सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी राहुरी तालुक्यातील धरणग्रस्तांनी केली आहे. सदर मागणीची शासन स्तरावर दखल न घेतल्यास येणाऱ्या सर्वच निवडणुकित मतदानावर या बारा ग्रामपंचायतीने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
याप्रसंगी मुळा धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मारूती बाचकर, उपाध्यक्ष ठकाजी बाचकर, सचिव संतोष बोरूडे, पोपट बाचकर, किशोर बाचकर, कोंडीराम बाचकर, आण्णासाहेब खिलारी, धोंडीराम बाचकर, संदिप बाचकर, अदिनाथ भिसे, जब्बार पठाण, अशोक काळे, नितेश शेलार, सिंकदर शेख, म्हातारबा बाचकर, मन्सुर देशमुख आदि उपस्थित होते.