अहिल्यानगर

त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ राहुरीत निवेदन

राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : त्रिपुरा राज्यातील मुस्लीम अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांवर तसेच त्यांच्या धार्मिक स्थळांवर काही जातीयवादी, धर्मांध लोकांकडून तसेच संघटनांकडून अमानविय हल्ले करुन धार्मिक स्थळांची तोडफोड करून अल्पसंख्याक समुदायातील निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या तसेच इस्माल धर्माचे संस्थापक प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याविषयी चिथावणी खोर व त्यांचा अवमान करणाऱ्या देशद्रोही लोकांवर कारवाई होऊन त्यांच्यावर देशद्राहाच्या कलमाखाली कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन मुस्लिम समाजाच्या वतीने राहुरीचे तहसीलदार यांना देण्यात आले.
भारतामधील पश्चिम भागात असणाऱ्या छोटया तसेच अति दुर्गम समजल्या जाणाऱ्या त्रिपुरा राज्यामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून काही असहिष्णु, धर्माध तसेच राक्षसी वृत्तीच्या लोकांकडून तसेच संघटनांकडून अल्पसंख्याक मुस्लीम समुदायातील लोकांवर वारंवार हल्ले करून अल्पसंख्यांक समुदायातील निष्पाप लोकांचा नाहक बळी घेण्यात आलेला आहे. सदर वरील लोकांकडून केला जाणारा हिंसाचार हा भारतीय धर्मनिरपेक्ष लोकशाही साठी मारक असुन त्यामुळे भारताची एकता ही खंडित झालेली आहे. सदर वरील धर्माध लोकांनी तसेच संघटनांकडून केलेले कृत्य हे देशद्रोही कृत्य असुन ते देशाच्या संविधाना विरुध्द आहे.
तसेच सदर असहिष्णु व धार्माध लोकांकडून तसेच संघटनांकडून वारंवार इस्लाम धर्माच्या पवित्र कुरआनाची विटंबना केली जात आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करुन त्यांचा अपमान केला जात आहे. जेणे करून संपूर्ण भारतातील मुस्लीम धर्मीयांमध्ये संतापाची लाट उसळून संपूर्ण देशात जातीय दंगली करण्याच्या दृष्ट हेतु या मधुन स्पष्टपणे अधोरेखीत होत आहे. ज्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात दंगली घडवून मोठ्या प्रमाणात सामुहित हत्याकांड घडवून देशाला बरबाद करुन तोडण्याचा देशद्रोही पणा या जातीय संघटनाकडून तसेच असहिष्णु व धर्माध लोकांकडून केला जात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी इम्रान नबी देशमुख, जीशान शेख, इम्रान सय्यद बिलाल शेख, अफनान आतार, मुफ्ती अजमल, मौलाना असलम, मुसद्दिक पठाण, रईस इनामदार आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button