अहिल्यानगर

पतीपत्नीमध्ये प्रेम व ऐक्य राहणेसाठी प्रेमाची जिव्हाळ्याची गरज – फा.विलास सोनवणे

श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : हरिगाव मतमाउली जन्मोत्सव निमित्त शुभारंभानंतर नऊ दिवशीय नोव्हेना प्रसंगी नोव्हेनाचे चौथे पुष्प फा. विलास सोनवणे राहुरी यांनी गुंफताना प्रतिपादन केले की आजचा विषय आहेलग्नसंस्कार”प्रथम आपण सर्व संत तेरेसा यांना स्मृतीदिनी अभिवादन करू या. 


तारुण्यांच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलामुलींना प्रश्न केला की धर्मगुरू होण्यासाठी काय विचार आहे तर सांगतात सध्या नाही आणि त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न जर विचारला लग्नाचे काय? मग मात्र मनामध्ये उकळ्या फुटतात व ओठावर वाक्य येतात की मेरे सपनोकी राणी कब आयेगी? मुलगीपण आपल्या अंत:करणात म्हणत असते मेरा सपनोका राजकुमार कहा है? लग्न किंवा विवाह हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. हे एक बोलावणे आहे, पाचारण आहे. परमेश्वर व्यक्तींना वेगवेगळ्या कारणासाठी पाचारण करीत असतो व जेंव्हा तुम्ही विवाह करता ही तुमची व्यवस्था असेल. ही परमेश्वराने स्वर्गात निर्माण केलेली योजना आहे. ख्रिस्ताने जशी ख्रिस्त सभेवर प्रीती केली आहे तशी तुम्हीही आपल्या पतीवर करा. मुलानो आपल्या आईबापांच्या आज्ञेत रहा, अशा या विवाह संस्थेला साक्रामेंत हे एक महत्वाचे स्थान मिळालेले आहे.

विवाह संस्था म्हणजे फक्त दोन व्यक्तीमधील तो करार नाही. हा संस्कार ख्रिस्त सभेचे धर्मगुरू व भाविक यांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जाणारा संस्कार आहे. हे अदृश्य कृपेचे दृश्य चिन्ह आहे. मदर तेरेसा ह्या युरोपात एका भाषणात म्हणाल्या की हि कुटुंब ही मानव जातीला दिलेली समाजाची देणगी आहे. ख्रिस्ती कुटुंबाची स्थापना ही परमेश्वराने आपल्या हाताने दिली आहे. म्हणून देवाने स्थापन केलेली ही संस्था आहे त्यात कुटुंबात प्रत्येकाला सामावून घेतले पाहिजे. जेंव्हा पती व पत्नी एकमेकांना जिवन एकत्र राहण्याची संमती देतात किंवा ते एकमेकाना स्वीकारतात. ते खऱ्या अर्थाने एक सामाजिक जीवनाला सुरुवात होते. जो मनुष्य एकटा राहतो तो प्रगती करू शकत नाही. प्रत्येक पतीने पत्नीसाठी व पत्नीने पतीसाठी रोज दोन मिनिटे प्रार्थना करावी. या विवाह संस्कारामध्ये जे हक्क व कर्तव्ये प्रस्थापित झालेली असतात. त्यामध्ये पहिले आहे. कोणाला लग्न करण्याचा हक्क आहे?लग्नाचा जो हेतू आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. त्यात प्रेम व ऐक्य असले पाहिजे. पती पत्नी मध्ये विश्वास असला पाहिजे. लग्न संस्कार हे ऐक्याचे प्रतिक आहे. तो विश्वासाच्या पायावर रचला आहे. पती पत्नीने या वैवाहिक जीवनात कायमस्वरूपी राहिले पाहिजे.

माझे कुटुंब देवासमोर ठेवू या. माझे कुटुंब देवाच्या योजनेप्रमाणे आहे का? माझ्या कुटुंबामध्ये देवाची किती उपस्थिती आहे? त्यासाठी कौटुंबिक अध्यात्म असणे गरजेचे आहे. हि कौटुंबीक अध्यात्मता आहे. अशा प्रकारचे प्रेम व ऐक्य पतीपत्नीमध्ये जरूर राहण्यासाठी शब्दाची, भाषेची गरज नाही. फक्त त्याला गरज आहे “प्रेमाची जिव्हाळ्याची”हे प्रेम जिव्हाळा आपल्या कुटुंबात असेल तर आपली कुटुंब व्यवस्था व ख्रिस्ती कुटुंब नक्कीच आजही देवाच्या इच्छेप्रमाणे आजही जगात चालू आहे. असेच आज म्हणू या आजच्या नोव्हेना प्रसंगी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक, रिचर्ड, आनद बोधक सहभागी होते. 

दि ६ सप्टे रोजी ख्रिस्तशरीर संस्कार या विषयावर फा आशिष म्हस्के यांचे प्रवचन होणार आहे. सर्व कार्यक्रम हे ऑनलाईन प्रसारित होत आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा कोरोना प्रादुर्भाव असल्याने मतमाउली यात्रा भरणार नाही. त्यामुळे सर्व भाविकांनी घरी राहून भक्ती व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन हरिगाव प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांनी केले आहे. ११ सप्टे रोजी नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी लूरडस डानियल यांचे पवित्र मारिया जन्मोत्सव दिनी पवित्र मिस्सा राहील त्याचेही ऑनलाईन प्रक्षेपण होईल.

Related Articles

Back to top button