ठळक बातम्या

पेन्शनर्सचा प्रश्न निश्चित मार्गी लागेल – कमांडर राउत

श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : येत्या २/३ महिन्यात इपीएस पेन्शनर्सचा प्रश्न निश्चित मार्गी लागेल असे आश्वासन बुधवारी मार्कंडेय संकुल अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय इपीएस पेन्शनर्स मेळाव्यात राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राउत यांनी दिले.

   त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा वृतांत सांगताना राउत म्हणाले की पंतप्रधान यांचे बरोबर झालेल्या भेटीमध्ये अतिशय समाधानकारक चर्चा झाली व आम्हाला कमीत कमी रु ७५००/-दरमहा पेन्शन मिळावी व त्यात महागाई भत्ता मिळावा. आरोग्य सुविधा मोफत मिळाव्यात व कोर्ट निर्णयाप्रमाणे हायर पेन्शन लागू करावी. या मागणीचा आग्रह पंतप्रधान यांचेकडे धरलेला होता. खा.हेमा मालिनी यांनी सुद्धा पेन्शनर्स यांचा प्रश्न लवकर सुटावा यासाठी पंतप्रधान यांना कळकळीची विनंती केली. १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आपले भाषणात त्याची घोषणा करावी, अशी पंतप्रधान यांना विनंती केली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की आपली मागणी रास्त असून त्यावर मी संबंधित खात्याशी विचार विनिमय करीत आहे. त्यामुळे १५ ऑगस्टला जाहीर करता येणार नाही. पण येत्या २/३ महिन्यात यावर निश्चित मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळी मंत्री डॉ जितेंद्रसिंग यांना निर्देश देऊन लवकर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

ते पुढे म्हणाले की आपला प्रश्न लवकर सुटावा म्हणून आपण सर्व पेन्शनर्स यांनी संघटीत होऊन शासनावर दबाव निर्माण करावा. येत्या १९ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे सुरु असलेल्या साखळी उपोषणास १००० दिवस पूर्ण होत आहे. त्यादिवशी उपोषणास पाठींबा म्हणून सर्व जिल्ह्यामध्ये पेन्शनर्स यांनी मूकमोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करावे. या मेळाव्यास राष्ट्रीय सल्लागार डॉ पी एन पाटील, राष्ट्रीय संघटक सचिव सुभाष पोखरकर, महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा कविता भालेराव, महाराष्ट्र कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर आदींचे समयोचित भाषणे झाली. यावेळी नगर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यातील पेन्शनरांची संख्या लक्षणीय होती. राज्यस्तरीय मेळाव्यास महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष शोभाताई आरस, पश्चिम क्षेत्र सचिव सरिता नारखेडे, म.रा.अध्यक्ष एस एन आंबेकर, राज्य कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंग अण्णा जाधव, पुणे जिल्हाध्यक्ष सतीश शिंदे, उपाध्यक्ष मराठवाडा दादाराव देशमुख, अध्यक्ष महिला आघाडी कविता भालेराव, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष ज्योती शर्मा, संजय मुनोत, नारयण होन, संपत समिंदर, सुकदेव आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button