ठळक बातम्या

राहुरीच्या सिंघमची जनता पाहते वाट

पोलिस निरीक्षक दुधाळ यांच्या बदलीने जनतेत रोष


राहुरी प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्यातील मध्यवर्ती तसेच शिर्डी शिंगणापूर बरोबरच अखंडपणे अविरत वाहणारा नगर -मनमाड हायवे यासाठी नेहमीच पोलीस प्रशासन सज्ज ठेवावे लागत असल्या कारणाने येथे काम करणारे अधिकारी खमक्या अधिकाऱ्यांची गरज असते आणि नेमके तेच पोलीस अधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी राहुरी पोलिस निरीक्षक म्हणून नंदकुमार दुधाळ यांची निवड केली. बिघडलेली कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तालुका पिंजून काढून अनेक अवैध धंदे, तसेच इतर मोठ्या प्रमाणावर कारवाया सिंघम स्टाईलने केल्या आणि बघता बघता राहुरी तालुक्यात पुन्हा एकदा सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ नंतर नंदकुमार दुधाळ आले हि खात्री सर्व सामन्यांना पटल्याने आनंद व्यक्त केला गेला. राहुरी येथे चार महिन्यापूर्वी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची तडकाफडकी नाशिक ग्रामीण येथे बदली झाली. त्यांच्या जागी नव्याने राहुरी येथे आलेले सपोनि निरीक्षक शंकरसिंह रजपुत यांच्याकडे प्रभारी चार्ज दिला आहे. राहुरी येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पदभार स्वीकारल्यापासुन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून गेल्या चार महिन्यांमध्ये कडक कारवाई केली होती. त्यामध्ये दारू अड्ड्यांवर छापे, वाळू माफियांवर छापे टाकून सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे यांच्या बदलीचे संकेत गेल्या एक महिन्यापासून सुरू होते. दुसऱ्या बाजूला त्यांची बदली होऊ नये म्हणून सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा होत होती. बाबासाहेब धोंडे यांनी यासंदर्भात बदली करू नये अशी मागणी केली होती. मात्र ,काल सोमवारी अचानक पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची नाशिक येथे बदली झाली. त्यामुळे राहुरी मध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. बदली का ? झाली खमक्या अधिकारी म्हणून दुधाळ यांनी सर्व सामान्यांमध्ये एक विश्वास निर्माण केला असल्याने त्यांची पुन्हा नव्याने राहुरी तालुक्यात बदली व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे रुजू झाल्यापासून तालुका हद्दीत गुन्हेगार तसेच अवैध व्यवसायिकांमधे धास्ती निर्माण झाली आहे. दुधाळ हे एक खमके पोलिस अधिकारी असुन ते लवकरच तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यशस्वी ठरतील त्यामुळे त्यांची पुन्हा राहुरीत नियुक्ती करावी.
~ सुनिल हिवाळे पाटील (सामाजिक कार्यकर्ते)

Related Articles

Back to top button